State Employees GR : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे कर्तव्य भत्यासह, जुनी पेन्शन, ग्रॅज्युटी उपदान, यासारख्या शासन निर्णयाचा समावेश आहे.तर काय आहे बातमी पाहूया असे विस्तार.
State Governments Employees GR
होमगार्ड कर्तव्य भत्ता : सर्वात प्रथम होमगार्ड यांच्या कर्तव्य भत्त्यात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. सध्या होमगार्ड यांना 570 रुपये भत्ता मिळत होता, तो आता 1083 रुपये करण्यात आला. याशिवाय उपाय बता दोनशे रुपये कवायत भत्ता 180, त्याचबरोबर भोजन भत्ता 250 रुपये अशा सर्वच भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे होमगार्ड असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
विशेष शिक्षक पद निर्मिती
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सध्या कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे रिक्त पदावर ती समायोजन करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित पदांवरती नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
प्रत्येक केंद्रावर ती एक अशाप्रमाणे 4660 करते विशेष शिक्षकांची असणार आहेत ज्यामध्ये शिक्षण उपक्रमासाठी 2872 विषय शिक्षक तर अपंग समावेश शिक्षणासाठी 328 शिक्षक, अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर 54 पदे असे एकूण 2984 शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल.
सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान रक्कम वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान रकमेची मर्यादा 14 लाखांवरून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे.
या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
एक नंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या व एक नोव्हेंबर 2005 च्या नंतर झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना चा लाभ मिळणार आहे.
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) 1984 व सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अनुषांगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एकवेळचा पर्याय देण्यात येईल.
कोतवाल वेतनात 10 टक्के वाढ
ग्रामीण भागातील सध्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कोतवालांच्या मानधनात तब्बल दहा टक्के वाढ करण्यास निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अनुकंपा पद्धतीने कोतवाल यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत मोकळा झाला आहे.