State Employee News : नमस्कार मित्रांनो! आपल्याला माहिती असेल की,सध्या देशासह राज्यामध्ये आठवा वेतन आयोगाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगाची स्थापना केलेली असून जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.
महाराष्ट्रातील खालील स्वर्गातील कर्मचाऱ्यांना अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त पगार होणे अपेक्षित असताना,त्यांच्या वेतनासाठी निधी अपूर्वा पडल्याची बातमी समोर आलेली आहे तर काय आहे अपडेट पाहूया सविस्तर …
State Employees Salary News
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC) हजारो कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतनाचे संकट उभे राहिले आहे. मार्च महिन्याचा पगार अद्यापही अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे. वेळेवर वेतन न मिळणे ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीचीच बाब झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सरकारने महामंडळाला मार्च महिन्याच्या वेतनासाठी केवळ ४० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
“MSRTC Employee” च्या वेतनासाठी किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना, केवळ ४० कोटी रुपये मिळाल्याने पूर्ण पगार देणे शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सरकारने फक्त ४० कोटी रुपयांचा निधी एसटी बँकेकडे वर्ग केला आहे, पण वेतनासाठी किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पैसे पुरेसे नाहीत.”
सदरील निधीअभावी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून,अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण वेतनासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
MSRTC Employees update
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपयांची गरज असताना, केवळ ४० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याने सरकार या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. महामंडळाला तब्बल २६० कोटी रुपये कमी मिळाल्याने आता कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा होणार? हा एक मोठा यक्षप्रश्न आहे.
आता आगामी काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सरकार काय भूमिका घेते आणि महामंडळ याबाबत काय पाठपुरावा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर राज्याच्या परिवहन सेवेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आता राज्य सरकारकडून यावरती तोडगा काढून पूर्ण निधी व वर्ग करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा कर्मचारी वर्ग कडून व्यक्त करण्यात येत आहे.