Employees Earn leave : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपैकी खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणासंदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या कर्मचाऱ्यांना आपल्या अर्जित रजेचे रोप करण करता येणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर …
State Employees Earn leave
आपल्याला माहिती असेल की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक कर्मचारी हे दीर्घ सुट्टीच्या वेगामध्ये कार्यरत असतात. ज्यामध्ये शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक,ग्रंथपाल,प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला यांचा समावेश असतो. आता यांना अनुज्ञेय असलेल्या एकूण २० दिवस अर्धवेतनी रजेऐवजी दि.०१/०१/१९९७ पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षात १० दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील अशी तरतूद वित्त विभागाच्या दि.०६/१२/१९९६ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.
अर्जित रजा रोखिकरण होणार!
महाराष्ट्र नागरी सेवा रजा अधिनियम नियम १९८१ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठविण्याची आणि सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची तरतुद वित्त विभागाच्या दि.१५/०१/२००१ च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेली आहे.
मा.उच्च न्यायालय,मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्र. १२२४५/२०२२ मध्ये केंद्र प्रमुखांच्या अर्जित रजा व रजा रोखीकरणाबाबत धोरण निश्चित करण्याचाबत निर्देश दिलेले आहे. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत केंद्र प्रमुखांना दीर्घ सुटी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबाबत विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व सदर संचित विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणे यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
अर्जित रजा नियमावली
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम क्र. ५४ नुसार दीर्घ सुटी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही वर्षात त्याची दीर्घ सुट्टी चालू असताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात अर्जित रजा मागण्याचा अधिकार असणार नाही.
राज्य कर्मचाऱ्याने दीर्घ सुटीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर, त्या वर्षाच्या संबंधात त्याला त्यांनी लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचे संपूर्ण दीर्घ सुटीशी जे प्रमाण असेल त्याप्रमाणात ३० दिवसापैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असेल.
State Employees Incash leaves
थोडक्यात ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या वरीष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुटीच्या कालावधीत काम केले असेल आणि त्या संदर्भात वरिष्ठांनी प्रमाणित केले असेल अशा दीर्घ सुट्टीच्या कालावधीतील केलेल्या कामाबद्दल अर्जित रजेचे रोखीकरण होणार आहे.
अशा दीर्घ सुटीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी १० दिवसांसाठी (३० दिवसाच्या मर्यादेत) एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय असणार असून संबंधित रजेचा संचय करता येणार असून सेवानिवृत्तीच्या वेळेस वेळेस रोखीकरणास पात्र असणार आहे.