Employee Transfer : शासकीय कर्मचा-यांचे बदलीचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतुद करण्याकरिता अधिनियम २००५ अंमलात आला आहे.
सदरील अधिनियमातील कलम ६ मध्ये गट-अ ते गट-ड संवर्गातील अधिकारी/कर्म-यांच्या बदल्या करण्यास सक्षम प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत.
दि.०२.०६.२०१५ च्या शासन निर्णयान्वये कृषि विभागातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्यात आले असून सदर अधिकारांमध्ये संदर्भ क्र.५ येथील दि.२२.०४.२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.
State Employee Transfer Update
मित्रांनो, दि.०९.०६.२०१५ रोजीच्या आदेशान्वये गट-क व गट-ड येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार प्रत्यार्पित करण्यात आले आहेत. आता शासनाचे दि.२२.०४.२०१६ मधील शासन निर्णयामध्ये तसेच आयुक्त (कृषि) यांचे दि.०९.०६.२०१५ मधील आदेशामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या कलम-६ मधील परंतुक २ व कलम ७ नुसार दि.२२.०४.२०१६ च्या शासन निर्णयामध्ये कृषि विभागातील गट-अ, गट-ब संवर्गातील अधिका-यांची बदली करण्याचे अधिकारामध्ये खालील क्र.१ नुसार तसेच गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे अधिकार प्रत्यावर्तीत करण्याबाबत आयुक्त (कृषि) यांचे दि.०९.०६.२०१५ मधील आदेशामध्ये खालीलप्रमाणे क्र.२ नुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत.
गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या संदर्भात शासकीय कर्मचा-यांचे बदलीचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास, प्रतिबंध करण्यासाठी तरतुद करण्याकरिता अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार बदल्या करतांना मध्यावधी बदलीसाठी मा. मंत्री (कृषि) सक्षम प्राधिकारी असले, तरीही सा.प्र.वि. दि.२९.०५.२०१५ रोजीच्या शासन परिपत्रकामधील निर्देशानुसार गट-अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्या करताना मा. मुख्यमंत्री महादयांची मान्यता घेणे आवश्यक राहील.