Bal Ashirwad Yojana : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना सुरू केली आहे,ज्याचा उद्देश पालकांच्या मृत्यूमुळे आर्थिकदृष्ट्या असुरक्षित झालेल्या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.
बाल आशिर्वाद योजना योजनेअंतर्गत, पात्र मुलांना दरमहा 4 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.सदरील योजने संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Mukhyamantri Bal Ashirwad Yojana
ज्या मुलांच्या दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू 01 मार्च 2020 नंतर झाला असेल अशा
मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत या योजनाचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 72 हजार किंवा 75 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना याचा लाभ दिला जाईल.
सदरील मदत मुलाच्या शिक्षण,आरोग्य आणि इतर गरजांसाठी वापरली जाऊ शकते.पालकांच्या मृत्यूमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यास मदत करते.
बाल आशिर्वाद योजना कागदपत्रे
- मुलाचे आणि आईचे संयुक्त बँक खाते (जर आई नसेल, तर नियमानुसार इतर पालकाचे खाते)
- शिधापत्रिका (Ration Card)
- आधार कार्ड (मुलाचा आणि आईचा/पालकाचा).
- शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांनी लिहिलेले प्रमाणपत्र
- वडिलांचे/पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र
- कुटुंबाचा उत्पन्न दाखला
- मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना
- मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजनेसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन सादर करता येतो.
- जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय किंवा तालुका कार्यालयात अर्ज मिळू शकतो.
- महाराष्ट्र सरकारच्या https://maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरूनही फॉर्म डाउनलोड करता येते.
- संपूर्ण भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावा.